Saturday, September 3, 2022

बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी - गणपतीच्या सणाला



तो साधारण ५० - ६० वर्षांपुर्वीचा काळ असेल. दळणवळणाची साधने पुरेशी उपलब्ध नव्हती. खेडी अजून वैचारिकदृष्ट्या सुधारली नव्हती. खेडेगावातील स्त्रीजीवन अत्यंत बिकट व खडतर होते. संसार, चुल आणि मूल यात बाईचे जीवन गुरफटून गेले होते. सोबत सासू - सासरे, नणंद आणि नवरा यांचा जाच - छळ ठरलेला असायचा. हुंडा, मानापमान, सासरकडून दबाव या गोष्टींखाली स्त्रीजीवन दबले गेले होते. थोडक्यात, स्त्रीजीवन त्याकाळी तणावात जगत होते. अशावेळी माहेरची ओढ लागणे स्वाभाविक होते. रक्षाबंधन, गौरी - गणपती, भाऊबीज हे सण म्हणजे स्रीजीवनातील एक आनंदोत्सव असे. अशावेळी भावाला सासरी बहिणीला आणण्यासाठी धाडले जायचे. प्रत्येक सासरवाशीण माहेरहून येणाऱ्या आपल्या लाडक्या भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसते असे. कधी एकदा बैलगाडीच्या घुंगरांचा तो सुखद आवाज कानावर पडतो असे होई. त्यावेळी माहेरी जाण्यास आतुर असलेली स्त्री मनाशी गुणगुणत असे, 

"बंधू येईल माहेरी न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला

गाडी घुंगराची येईल न्यायला

गाडी घुंगराची येईल न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला"

No comments:

Post a Comment